Saturday, February 1, 2014

RADHANAGARI DAM

राधानागरी व आसपापरिसराला लाभलेली जलसंजीवनी म्हणजे राधानगरी धरण होय

राधानगरी धरण

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा मुख्य उपयोग शेतीसाठी पाणी पुरवठा व वीज निर्मितीसाठी होतो.
राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या माध्यमातून महाराजांनी राधानगरी धरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार केला. १९०७ ला त्यांनी धरणाची योजना पुढे आणली.
१९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्याचे "राधानगरी' असे नामकरण करण्यात आले. १९०९ ला धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून "राधानगरी' ओळखले जाते. बाकी आजही भक्कमपणाच्या बाबतीत या धरणाला तोड नाही.


धरणाची माहिती




gate
 

राधानगरी धरण
धरणाचा उद्देशसिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
भोगावती नदी
स्थानफेजीवडे, राधानगरी तालुका, कोल्हापूर जिल्हा,महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस५५७० मि.मी.
लांबी१०३७ मी.
उंची३८.४१ मी.
बांधकाम सुरू१९०८
उद्‍घाटन दिनांक१९५५
ओलिताखालील क्षेत्रफळ१७२३ हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता२३६.७९ दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ१८.१३ वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
स्थापित उत्पादनक्षमता१० मेगावॉट

No comments:

Post a Comment